Monday, January 6, 2020

ऑस्ट्रेलियातील अग्नितांडव

ऑस्ट्रेलियातील जंगलांमध्ये सप्टेंबर २०१९ पासून सतत वणवा पेटत आहे. यामध्ये आतापर्यंत ५० कोटी प्राण्यांचा बळी गेला आहे. १२०० घरे भस्मसात झाली असून २३ लोकांचा मृत्यू झाला आहे. आगीचे लोळ जमीनीपासून २०० फूट वर जात आहे. निळे आकाश तांबड्या रंगाचे झाले आहे. कोरडी हवा, दीर्घकाळापासून असलेला दुष्काळ आणि वाढलेले वारे यांमुळे हे वणवे लागत आहेत.




ऑस्ट्रेलिया हा पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात असून त्याच्या मध्यातून मकरवृत्त (Tropic of capricorn) जाते.
२१ सप्टेंबरला सूर्य विषुववृत्तावर (equator) असतो. तेथून त्याचा दक्षिणेकडे प्रवास चालू होऊन २२ डिसेंबरला तो मकरवृत्तावर जातो. यावेळी ऑस्ट्रेलियात उन्हाळा असल्याने तीव्र सूर्यकिरण पडतात. सध्या सूर्य धनु राशीत आहे. बर्‍याच काळापसून गुरु, शनि, केतू हे मोठे ग्रह धनु या अग्नितत्त्वाच्या राशीत आहेत. नुकतेच २६ डिसेंबरला धनु राशीत मूळ या तीक्ष्ण नक्षत्रात सूर्यग्रहण झाले. पाश्‍चात्य ज्योतिषी टॉलेमी याने ऑस्ट्रेलियाची धनु रास मानली आहे. अग्नितत्त्वाच्या प्रकोपामुळे ऑस्ट्रेलियावर भयंकर संकट कोसळलेे. हर्षल मेष राशीत वक्री आहे. ग्रह वक्री असतांना पृथ्वीच्या जवळ असतो. सप्टेंबर २०२० पासून मंगळ हा सिंह, कन्या, तूळ या राशींमधून भ्रमण करून आता वृश्‍चिक राशीत आला आहे. धनु राशीकडून सिंह, कन्या, तूळ या राशी नवम, दशम, एकादश या स्थानांत म्हणजे दक्षिण प्रभागात येतात. दक्षिणेत मंगळ बलवान असतो. ग्रह आपला प्रभाव कसे दाखवतात, हे यातून लक्षात येते. आवश्यकता आहे, ती फक्त त्यांचे सतत निरिक्षण करून परिणाम आजमवण्याची !

ऑस्ट्रेलियाच्या उदाहरणातून सर्व देशांनी बोध घेणे आवश्यक आहे. निसर्गावर विजय मिळवण्याच्या धुंदीत मानवाने स्वत:साठी खड्डा खोदला आहे. जानेवारी २०२० मध्ये शनि मकर राशीत प्रवेश करणार आहे. भारताची रास मकर असल्याने आगामी काळ भारतासाठी प्रतिकूल आहे. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी भारताने तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे !

ऑस्ट्रेलियातील अग्नितांडव ऑस्ट्रेलियातील जंगलांमध्ये सप्टेंबर २०१९ पासून सतत वणवा पेटत आहे. यामध्ये आतापर्यंत ५० कोटी प्राण्यांचा बळी गे...